Posts

Showing posts from December, 2020

दुर्दैवी सत्य

दुर्दैवी सत्य नमस्कार मित्रांनो सगळे मजेत ना. आजच्या समाजातले एक दुर्दैवी सत्य मी तुमच्यासमोर आणू इच्छितो. सहज कधी मार्केटला जात असताना सकाळी सकाळी जेवढी गर्दी वाईन शॉपी आणि बिअर शॉपी वर असते ती पाहून आश्चर्य वाटते. काही लोक जगण्यासाठी पितात की काय असं वाटतं. मागील सहा महिने लोक डाऊन मध्ये जे आपण चित्र पाहिले ते खूप विचित्र होते या कोरोना रोगा च्या, काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी गर्दी केली होती एक उदाहरण आपल्यासमोर आहे. तुम्हाला माहित आहे का कधी तुम्ही निरीक्षण करा जेवढी गर्दी वाईन शॉप वर असते त्यापेक्षा कमी प्रमाणात कमी गर्दी मेडिकल स्टोअर असते. याचा अर्थ असा नाही की, व्यवसायिकदृष्ट पाहिलं गेलं तर मेडिकल स्टोअर्स मधिल वस्तू पेक्षा दारू जास्त प्रमाणात विकली जाते. दारूने काही आजार बरे होत नाही, पण सगळ्या आजाराचे कारण दारू आहे. ज्याप्रमाणे लोक दारूपायी संसाराचे वाटोळे करतात. पण हे सर्वसामान्य लोकांना समजत नाही. भरपूर साऱ्या कीर्तनकारांनी यावरती भाष्य केले आहे पण समाजामध्ये काही बदल होत नाही. योग्य वाटले तर यावर विचार करा आणि मला प्रतिसाद द्या.

दुर्दैवी सत्य

दुर्दैवी सत्य नमस्कार मित्रांनो सगळे मजेत ना. आजच्या समाजातले एक दुर्दैवी सत्य मी तुमच्यासमोर आणू इच्छितो. सहज कधी मार्केटला जात असताना सकाळी सकाळी जेवढी गर्दी वाईन शॉपी आणि बिअर शॉपी वर असते ती पाहून आश्चर्य वाटते. काही लोक जगण्यासाठी पितात की काय असं वाटतं. मागील सहा महिने लोक डाऊन मध्ये जे आपण चित्र पाहिले ते खूप विचित्र होते या कोरोना रोगा च्या, काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी गर्दी केली होती एक उदाहरण आपल्यासमोर आहे. तुम्हाला माहित आहे का कधी तुम्ही निरीक्षण करा जेवढी गर्दी वाईन शॉप वर असते त्यापेक्षा कमी प्रमाणात कमी गर्दी मेडिकल स्टोअर असते. याचा अर्थ असा नाही की, व्यवसायिकदृष्ट पाहिलं गेलं तर मेडिकल स्टोअर्स मधिल वस्तू पेक्षा दारू जास्त प्रमाणात विकली जाते. दारूने काही आजार बरे होत नाही, पण सगळ्या आजाराचे कारण दारू आहे. ज्याप्रमाणे लोक दारूपायी संसाराचे वाटोळे करतात. पण हे सर्वसामान्य लोकांना समजत नाही. भरपूर साऱ्या कीर्तनकारांनी यावरती भाष्य केले आहे पण समाजामध्ये काही बदल होत नाही. योग्य वाटले तर यावर विचार करा आणि मला प्रतिसाद द्या.

मतलबी दुनिया

नमस्कार मित्रांनो, सगळे काही मजेत ना. मतलबी दुनिया एका नवीन उदाहरण सांगतो. मी आज रोज प्रमाणे पुणे नाशिक हायवे याने येत असताना. एक उसाचा ट्रॅक्टर चा टायर पंचर झालेला होता . गाडीचा ड्रायव्हर टायरची पंचर काढण्यात मग्न होता. काही बघे लोक रस्त्याने त्याच्याकडे पहात चालले होते, पण त्याला कोणी मदत करत नाही , पण त्याच्या या ट्रॅक्टर मधील उस चोरी करण्यास मग्न होते. उसाची गोडी साखरेप्रमाणे गोड असते पण त्या ड्रायव्हरचे हाल कोणी पहात नव्हते. संत श्री तुकाराम महाराज यांनी आपल्याला मिळालेल्या किर्तनाच्या स्वरूपातील बिदागी ऊस सगळ्या गावात वाटला आणि खाली हाताने घरी गेले. आजचा काळ इतका मतलबी आहे , की लोक दुसऱ्याच्या दुःखावर हसतात आणि आणि त्याला मदत न करता त्यापासून काही लाभ होतो का हे पाहात असतात. मी एक सामान्य माणूस आहे मला जे समाजात दिसते , मी त्यावर विचार करतो आणि तुमच्या समोर तो विचार मांडतो हे योग्य आहे का एखाद्याच्या दुर्बलतेचा फायदा उचलणे आणि त्याला काहीच मदत न करणे. योग्य वाटले तर यावर विचार करा आणि मला प्रतिसाद द्या. सागर जगताप

Popular posts from this blog

दुर्दैवी सत्य

मतलबी दुनिया